......................सुंदरकाण्ड (सर्ग 1 ते 5).....................
सर्ग 1 - सुंदरकाण्ड: प्रथमः सर्गः
मारुतीची उडी, त्याची परीक्षा पाहण्यासाठी देव सुरसेला पाठवितात, मारुती व सुरसा ह्यांचा संवाद, मारुती तिच्या तोंडात जाऊन बाहेर येतो, आकाशमार्गाने जात असता समुद्राच्या सांगण्यावरून मैनाक पर्वत त्याला आपल्या शिखरावर विश्रांती घेण्यास सांगतो, मारुती त्याला स्पर्श करून पुढे जातो, सिंहिकेचा वध, मारुती त्रिकूट पर्वतावर येतो, सूक्ष्मरुपाने लंकेत प्रवेश, लंकिनी मारुतीला अडविते, मारुती तिच्यावर मुष्टिप्रहार करतो, ती सीतेची माहिती सांगते, सीता व रावण ह्यांचे डोळे एकाच वेळी स्फुरण पावतात
सर्ग 2 - सुंदरकाण्ड: द्वितीयः सर्गः
मारुतीचा सूक्ष्मरूपाने अशोकवनात प्रवेश, तेथील शिंशपावृक्षाखाली मारुतीला सीतादर्शन, तो लपून बसतो, रावणाला मारुती पाहतो, रावण रामाची निंदा सीतेला ऐकवितो, सीता रावणाची निर्भत्सना करते, रावण सीतेच्या अंगावर धावून जातो, मंदोदरी निवारण करते, रावणाच्या सांगण्यावरून राक्षसी सीतेला छळतात, त्रिजटा राक्षसींचा प्रतिकार करते, सीता दुःखाने गळफास घेण्याचा विचार करते
सर्ग 3 - सुंदरकाण्ड: तृतीयः सर्गः
मारुती सीतेला ऐकू जाईल अशा आवाजात रामचरित्र गातो, सीतेला आनंद होतो, मारुती सीतेपुढे येऊन वंदन करतो-तिला खुणेची अंगठी देतो, सीता मारुतीची प्रशंसा करते, सीता खुणेची वस्तू म्हणून चुडामणी देते, खुणेची गोष्ट म्हणून काककथा सांगते, मारुती तिला आश्वासन देतो, मारुती फळे खातो व अशोकवनिका निर्वृक्ष करतो, राक्षसी मारुतीला पाहतात, रावणाला त्याने केलेली नासाडी कळवितात, रावण मारुतीवर अनेक राक्षस, सेनापती व मंत्री पाठवतो, मारुती त्यांचा वध करतो, रावणपुत्र अक्षाचा वध, रावण इंद्रजिताला मारुतीवर पाठवितो, इंद्रजित मारुतीला बांधून घेऊन जातो
सर्ग 4 - सुंदरकाण्ड: चतुर्थः सर्गः
मारुतीला बांधून सभेत आणतात, रावणाच्या सांगण्यावरून प्रहस्त मारुतीला त्याचा वृत्तांत विचारतो, मारुतीचा रावणाला उपदेश, रावण संतापतो, वानराचे तुकडे करण्यास सांगतो, बिभीषण त्याचे निवारण करतो, मारुतीच्या शेपटीला तेल लावून आग लावतात, सूक्ष्मरूप घेऊन मारुती बंधनमुक्त होतो, पुन्हा विशालरूप घेऊन लंकादहन करतो, अग्नि हा वायुचा मित्र असल्यामुळे व नामस्मरणामुळे शेपटी जळत नाही
सर्ग 5 - सुंदरकाण्ड: पञ्चमः सर्गः
मारुती सीतेचा निरोप घेऊन निघतो, मारुतीला पाहून वानर आनंदित होतात, ते रामसुग्रीवाला भेटण्यासाठी निघतात, मधुवनात शिरून वनाचा विध्वंस, दधिवक्र सुग्रीवाकडे कागाळी करतो, मारुतीला सीता सापडल्याची सुग्रीवाची खात्री होते, सुग्रीव वानरांना पाचारण करतो, मारुती रामाला सीतेचे वृत्त सांगतो, राम मारुतीचे आभार मानतो, मारुतीची योग्यता