.....................उत्तरकाण्ड (सर्ग 1 ते 9)......................
सर्ग 1 - उत्तरकाण्ड: प्रथमः सर्गः
पार्वती राज्याभिषेकानंतरचे रामवृत्त विचारते, अगस्त्यादि मुनि अभिनंदनार्थ रामभेट घेतात, इंद्रजिताच्या विशेष प्रशंसेचे कारण राम विचारतो, अगस्त्य रावणाची कुळकथा, मातापितरे, बंधुभगिनी यांची माहिती सांगतो
सर्ग 2 - उत्तरकाण द्वितीयः सर्गः
अगस्त्य पुढील कुळकथा सांगतात, तिघा भावांची तपश्चर्या तसेच ब्रह्मदेवाने प्रसन्न होऊन त्यांना दिलेल्या वरांचा वृत्तांत, सुमाली येऊन कुबेराकडून लंका घेण्याचा उपदेश करतो, रावण कुबेराला लंकेतून घालवितो, कुबेर शंकराच्या आश्रयाला जातो, रावणाला राक्षसांकडून लंकेचा राज्याभिषेक, तिघा बंधुंचा विवाह, इंद्रजिताचा जन्म, कुंभकर्णाला निद्रेकरिता गुहेची योजना, ब्राह्मणादिकांना रावणापासून त्रास, कुबेर त्याची कानउघाडणी करतो, रावण कुबेरावर चालून जाऊन त्याच्या पुष्पक विमानाचे हरण करतो, इंद्रजित इंद्राला जिंकून त्याला बांधून आणितो, ब्रह्मदेव इंद्राला सोडवितो, रावणाचा पराक्रम, नंदीकेश्वराचा शाप, रावणाची फजिती, वालीशी मैत्री करून रावण राज्य करतो, अगस्त्यकृत रामस्तुती
सर्ग 3 - उत्तरकाण्ड: तृतीयः सर्गः
अगस्त्य वाली व सुग्रीवाची जन्मकथा सांगतो, सीताहरणाची कथा सांगतो, विरोधभक्ति करण्याचा रावण निश्चय करतो
सर्ग 4 - उत्तरकाण्ड: चतुर्थः सर्गः
नारदमुनी रावणाला भेटतात, अत्यंत बलवान लोकं कोठे आहेत असे रावण विचारतो, नारद श्वेतद्विपात जाण्यास सांगतात, मंत्र्यांबरोबर रावण श्वेतद्विपाला जातो, तेथील स्त्रियांकडून लज्जित होतो, विष्णुच्या हातून मरण यावं या हेतूने रावण सीताहरण करतो, रामाची स्तुती करून अगस्त्य जातो, राम शूद्राला मारून ब्राह्मणपुत्राला जिवंत करतो व संसारी पुरुषाप्रमाणे राम वागतो, सर्वत्र शिवलिंगे स्थापन करतो, रामराज्यवर्णन, राम व सीता ह्यांचे गुणवर्णन, सीतेची रामाला प्रार्थना, रामाचे उत्तर, सीतेसंबंधी दूतवार्ता, सीतात्याग, वाल्मीकीच्या आश्रमात सीतेचा निवास, रामाची विरक्तता
सर्ग 5 - उत्तरकाण्ड: पञ्चमः सर्गः
लक्ष्मणाला रामाचा उपदेश - रामगीता
सर्ग 6 - उत्तरकाण्ड: षष्ठः सर्गः
च्यवनादि मुनि रामाकडे येऊन लवणापासून रक्षण करण्यास सांगतात, त्यांना अभय देऊन राम शत्रुघ्नाला लवणावर पाठवितो, लवणाचा वध, वाल्मीकीच्या आश्रमात रामपुत्र कुशलवांचा जन्म, राम अश्वमेध करतो, कुशलवांना घेऊन वाल्मीकी यज्ञस्थानी येतात, कुशाला ज्ञानोपदेश.
सर्ग 7 - उत्तरकाण्ड: सप्तमः सर्गः
कुशलवांच्या मुखाने रामायण ऐकून रामाला आनंद होतो, राम त्यांना दशसहस्त्र द्रव्य देऊ करतो, ते घेत नाहीत, ते सीतेचे पुत्र आहेत असे जाणून राम वाल्मीकींना आणवितो, यज्ञमंडपात वाल्मीकींबरोबर सीता येते, वाल्मीकींचे रामाला उद्देशून भाषण, रामाचे भाषण, ब्रह्मदेवादिक देवांचे आगमन, सीतेचे भाषण, सीतेचे भूगर्भात शिरणे, रामाचा सीतेसाठी शोक, कुशलवांना घेऊन राम अयोध्येला येतो, कौसल्येला रामाचा उपदेश, तिन्ही मातांना सद्गती
सर्ग 8 - उत्तरकाण्ड: अष्टमः सर्गः
भरताकडून रामाज्ञेने गंधर्व देशातील गंधर्वांचा वध, भरतपुत्र व लक्ष्मणपुत्र ह्यांचे राज्याभिषेक, मुनिवेषधारी कालाचे आगमन, त्याचा सत्कार, रामाबरोबर बोलताना एकांतात तिसरा कुणी आल्यास त्याचा वध करावा असे तो रामास सांगतो, तो ब्रह्मदेवाचा निरोप रामाला कळवितो व रामाचे त्यास उत्तर, दुर्वास मुनिंचे आगमन, रामाला त्वरित भेटण्याची त्यांची इच्छा, लक्ष्मणाची ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी स्थिती, सर्वनाशापेक्षा स्वतःचा नाश होणे बरे असा निश्चय करून त्याचे रामाला भेटणे, दुर्वास मुनिंची कार्यसिद्धि, रामाला आपल्या वचनाची आठवण होते, राम मंत्र्यांचा सल्ला घेतो, लक्ष्मणाचा त्याग, लक्ष्मण शरयूतीरी प्राणत्याग करतो, इंद्र त्याला स्वर्लोकी घेऊन जातो, देवांकडून त्याची पूजा
सर्ग 9 - उत्तरकाण्ड: नवमः सर्गः
लक्ष्मणाच्या वियोगाने झालेली रामाची मनस्थिती, रामाचा लक्ष्मणामागून जाण्याचा निश्चय, भरताचा शोक, प्रजेची रामावरील भक्ती, कुशलवांना राज्याभिषेक, शत्रुघ्नाला राम बोलावून घेतो, पुत्रांना राज्यावर बसवून शत्रुघ्न येतो, त्याचा रामाबरोबर जाण्याचा निर्धार, बिभीषण, सुग्रीवादि वानरांचा रामाबरोबर जाण्याचा निश्चय, मारुती-जांबवंत-बिभीषण यांना शेवटच्या आज्ञा, राम अखेरच्या प्रवासाला निघतो, अयोध्येची सर्व प्रजा रामाबरोबर निघते, राम शरयूतीरावर येतो, आकाशात देव येतात, ब्रह्मदेवाची प्रार्थना, रामाचे ब्रह्मदेवाला सांगणे, रामाची अवतारसमाप्ती, रामभक्तांचा शरयूत देहत्याग, ग्रंथमाहात्म्य.