...................अयोध्याकाण्ड (सर्ग 1 ते 9)....................
सर्ग 1 - अयोध्याकाण्ड: - प्रथम: सर्ग: 1
नारदागमन व त्याचा सत्कार, नारदकृत स्तवन, नारदागमनाचे कारण, रामाचे आश्वासन
सर्ग 2 - अयोध्याकाण्ड: - द्वितीय: सर्ग: 2
राज्याभिषेकाची तयारी, राममंदिरी वसिष्ठांचे आगमन, वसिष्ठांची प्रार्थना, राम लक्ष्मणाला राज्याभिषेकाची वार्ता सांगतो, दशरथ रामाभिषेकाचे वसिष्ठांशी बोलतो, मातांचा आनंद, आकाशवाणी, मंथरेच्या अंगात संचार व कैकेयीची कानउघाडणी, कैकेयी मंथरेच्या सांगण्यानुसार वागते.
सर्ग 3 - अयोध्याकाण्ड: - तृतीय: सर्ग: 3
कैकेयीला दुःखी पाहून दशरथाची दीनवाणी स्थिती, कैकेयी देऊ केलेले वर मागते, दशरथ घाबरून विनवणी करतो, कैकेयी हट्ट सोडीत नाही, दशरथाची दुःखस्थिती, लोकांची उत्कंठा, सुमंत्र राजाकडे जातो, दशरथ सुमंत्राकरवी रामाला आणवितो, दशरथ मूर्च्छित होतो, कैकेयी सर्व वृत्तांत रामाला सांगते, राम तिचे म्हणणे मान्य करतो, कैकेयी रामाला वनवास व भरताला राज्य मागून घेते, दशरथ रामाला भेटतो व त्याचा शोक, रामाचे आश्वासन, कौसल्या व सीता ह्यांची भेट.
सर्ग 4 - अयोध्याकाण्ड: - चतुर्थ: सर्ग: 4
राम कौसल्येला भेटतो, कौसल्येचे आवेशयुक्त भाषण, लक्ष्मणाचा संताप, रामाचा लक्ष्मणास उपदेश, कौसल्येचे सांत्त्वन, कौसल्येचा आशीर्वाद, लक्ष्मण-सीतेचा रामाबरोबर वनात जाण्याचा निश्चय, सीतेचा निर्धार, सीतेने जाताना केलेला दानधर्म, राम-सीता-लक्ष्मण दशरथाकडे जातात.
सर्ग 5 - अयोध्याकाण्ड: - पञ्चम: सर्ग: 5
नागरिकांचे दुःखाचे उद्गार, वामदेव व मुनि सांत्त्वन करतात, राम हाच विष्णु होय, अशी वामदेवांच्या सांगण्यावरून खात्री होते, राम सीतेसह कैकेयीकडे जातो व निरोप घेतो, वनाला प्रयाण, पौरांचा रामाला परतविण्याचा प्रयत्न, दशरथाची मूर्च्छा, तमसा नदीवर वास, युक्तिने पौरांना परतविले, श्रृंगवेरपुराजवळ गुहाची भेट, गुह रामाला राज्य अर्पण करतो, राम गुहाची समजूत घालतो, वडाच्या चिकाने जटा बांधणे व पर्णशय्येवर निजणे.
सर्ग 6 - अयोध्याकाण्ड: - षष्ठ: सर्ग: 6
गुहाचा लक्ष्मणाशी संवाद, नौकेत बसून गंगापार जातात, गुहाला राम परतवितो, भरद्वाजाश्रमी आगमन व सत्कार, भरद्वाजाकडून रामस्तुती, भरद्वाजाचा निरोप घेऊन वाल्मीकीच्या आश्रमी आगमन, वाल्मीकीने केलेला रामस्तव, वाल्मीकींचा वृत्तांत, रामाचा चित्रकूट पर्वतावर निवास
सर्ग 7 - अयोध्याकाण्ड: - सप्तम: सर्ग: 7
सुमंत्र परत येऊन दशरथाला भेटतो, दशरथाचा शोक, सुमंत्र सर्व वृत्तांत सांगतो, कौसल्येचे टोचून बोलणे, शापाची आठवण व श्रावणकथा, पुन्हा शोक व मृत्यु, वसिष्ठ भरताला आणवितो, कैकेयीकडून सर्व वृत्तांत कळतो, भरताचा शोक व संताप, भरत कौसल्येला भेटतो, वसिष्ठांचा बोध, दशरथाची उत्तरक्रिया, रामामागून जाण्याचा निश्चय
सर्ग 8 - अयोध्याकाण्ड: - अष्टमः सर्ग: 8
भरताला राज्यदान-त्याचे उद्गार, भरत, माता, वसिष्ठ वगैरे रामाकडे जातात, गुहाची भेट, गंगा उतरून भरद्वाजाश्रमी आगमन व दोघांचा संवाद, भरत चित्रकूट पर्वतावर जातो
सर्ग 9 - अयोध्याकाण्ड: - नवमः सर्गः 9
राम-भरत भेट, पित्याच्या मृत्युची वार्ता ऐकून राम शोक करतो, राज्य स्वीकारण्याविषयी भरताची रामाला प्रार्थना, राम भरताची समजूत घालतो, भरताचा निश्चय, वसिष्ठांचा भरताला उपदेश, भरत रामाच्या पादुका घेऊन अयोध्येला निघतो, कैकेयी रामाची क्षमा मागते, रामाचा कैकेयीला उपदेश, भरत रामपादुका सिंहासनी ठेवून राज्य करतो, राम अत्रि ऋषींच्या आश्रमी येतो, सीता-अनसूया भेट, अत्रि ऋषी रामाची स्तुती करतात